मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )
वर्धा :
सेलू तालुक्यातील बोरव्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गरमसुर गावाला येत्या वर्षभरात पुनर्वसनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर तथा पेंच व्याघ्र प्रकल्प संचालक डॉ. किशोर मानकर यांनी दिली.
गरमसुर गावाला नुकतीच भेट देऊन डॉ. किशोर मानकर यांनी ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. त्यांनी उपस्थितांना आश्वासन केले की, पुनर्वसनाची प्रक्रिया जलद गतीने राबवली जाईल आणि कोणत्याही कुटुंबाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, आर एफ ओ ज्ञानेश्वर गजवे, पुनम ब्राम्हणे, अर्चना नौकरकर, आरओ वसंत खेलकर, वनरक्षक विष्णू कदम, अनल अखंडे, विशाल धवने यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गरमसुर पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप सलाम, उपाध्यक्ष सुरेश शेंडे, सचिव गजानन डोंगरे, सहसचिव सुरेश वरठी, वामनजी कौरती, आनंदकौरती, जगन डोंगरे, पाडुरंग राऊत, सागर चोपडे, सरपंच अर्चना राऊत, उपसरपंच सुरेश शेंडे, सदस्य माधुरी घंडाळे, शोभा उईके, शोभा सलाम, उमेश सलाम, सुधाकर उईके तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.