संत केजाजी महाराज दिंडीचे सोमवारी प्रस्थान

337

हजार पेक्षा जास्त वारकरी सामील होणार 

सेलू ( घोराड ) :–

घोराड येथून तीन पायदळ दिंडीचे आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे प्रस्थान करीत असून ६ जून रोजी एका दिंडीचे प्रस्थान झाले आहे. येथून निघणारी दुसरी पायदळ दिंडी सोमवार १६ रोजी प्रस्थान करणार आहे.

ही दिंडी संत केजाजी महाराज नावाने आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळ्यात सामील होणार आहे .

या दिंडीचे संचालक ओढा येथील बबन महाराज कंक असून दिंडी चालक नरेश महाराज पाटील आहे. प्रति पंढरी येथून २००४ मध्ये या दिंडीला सुरुवात झाली या दिंडीचे हे २२ वे वर्ष आहे. ही दिंडी घोराड येथून सोमवार, १६ जून रोजी निघणार आहे ती आळंदी येथे वाहनाने जाणार आहे . आळंदी ते पंढरपूर माऊलीच्या पालखी सोहळ्यात सामील होणार आहे. आळंदी वरून १९ जून रोजी प्रस्थान करणार असून पंढरपूर येथे दिनांक ४ जुलै रोजी पोहोचतील या दिंडीचा चार दिवस मुक्काम वाखरी चौक लिंक रोड अजिंक्य बंगल्यासमोर राहणार आहे.

दिंडी चालक नरेश महाराज पाटील यांनी २००४ मध्ये संत केजाजी महाराज यांचे नावाने दिंडी सुरू केली या दिंडीचे विनेकरी घोराड येथील विठ्ठल रूखमाई देवस्थान चे ट्रस्टी बबन माहुरे महाराज होते . घोराड येथून निघणारी ही पहिली दिंडी असली तरी संत केजाजी महाराजापासूनची ही पंढरीचे वारीची परंपरा येथे संत नामदेव महाराजासह अनेक विठ्ठल भकता़नी कायम ठेवली त्याचा वारसा नरेश महाराजाचे नेतृत्वाखाली २२ वर्षा पासून या दिंडीचे माध्यमातून सुरू असून यात युवा, पुरुष व महिला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी राहणार आहे.

विनामूल्यआरोग्य सेवा

या दिंडी साठी अनेकांनी पंगतीची व्यवस्था केली असून या दिंडीत जवळपास १५०० हून अधिक वारकरी सामील होणार आहे या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घोराड येथील डॉ. सुरेंद्र भुते, वडगाव येथील डॉ. दिलीप बोबडे, नाशिक येथील डॉ. निशांत पगार, डॉ. ज्ञानेश्वर बोराडे हे विनामूल्य आरोग्य सेवा देणार आहे.

प्रति पंढरीतून घोराड येथून तीन दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करते त्यापैकी एक दिंडी ६ जून रोजी मार्गस्थ झाली. त्यानंतर सोमवार दि. १६ जून रोजी घोराड ते आळंदी ते पंढरपूर जाणारी दिंडी मार्गस्थ होणार आहे. तिसरी दिंडी गत काही वर्षापासून पायदळ जात होती ती दिंडी यावेळेस ट्रॅव्हल्स ने जाणार असल्याचे वारकरी सांगत आहे त्यामुळे पायदळ दिंडीचे रूप आता वाहनाने जाणाऱ्या दिंडीत झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही़नी केजाजी महाराजा़चे नावाचा घोराडचे नावाचा गैरवापर करीत आम्ही सेवक असलयाचे भासवत अनेकाकडून मोठ्या रकमा गोळा करून स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधला जात असल्याचा सूर गावात उमटत आहे. तिथे केजाजी महाराजांच्या नावाने मठाची उभारणी केल्याने आजही लोका़ची दिशाभूल होत आहे वास्तविक संस्थेचा याचेशी काहीही स़ब़ध नसल्याचे उघड झाले आहे.